Englishहिंदी
मराठीInterviewCreativityGalleryDesigned ByCongratulations |
विज्ञानमय जगतील एक राजहंस डॉ. रघुनाथ माशेलकर.
Interview
प्रत्येकाच्या जीवनातील काही क्षण असे असतात, की ते अविस्मरणीय राहतात, असे म्हणाना. ते क्षण मेंदुचा स्टोरेज विभागतात; पीडीएफ़ फ़ाइल बनून राहतात. मात्र हे क्षण चांगलेही असतील किंवा वाईट. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते अविस्मरणीय राहतात. असाच एक क्षण आम्हाला (ई-मॅग्जिन ग्रुप) अनुभवास आला तो म्हणजे "या विज्ञानमय जगातील एका राजहंसाशी झालेली एक भेट", एक संवाद, एक विज्ञानमय वातावरण.
तो दिवस होता, कात्रज (पुणे) येथील "सरहद" या संस्थेच्या विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन आणि प्रमुख उपस्थित पाहुणे "मा. श्री. प्रतापराव पवार" (सकाळचे संपादक) आणि डॉ. रघुनाथ माशेलकर की ज्यांच्या नावानेच ती प्रयोगशाळा सुरू होणार होती. असा एशियन स्टार जणू काही विज्ञानमय जगतील एक राजहंस की ज्याचे प्रखर तेज संपुर्ण परीसरात एक उत्साह निर्माण करे. सर्व औपचारीक कामे, उद्घाटण झाल्यानंतर डॉ. माशेलकर सर्वांना मार्गदर्शन करत होते. या वेळी मी व माझ्या सहकार्यांनी काही प्रश्न विचारले ते पुढीलप्रमाने; 1)सर, आपल्या देशाची प्रगती कशी होईल?आपला देश महासत्ता कसा होईल? उत्तर: ज्ञानविज्ञान, तंत्रज्ञान यातून जी प्रगती होते, ती आपण पाहिली आहे. अमेरीका अमेरीका का झाली? कारण त्यांनी ज्ञानविज्ञान, तंत्रज्ञान यामध्ये प्रचंड विकास केला आहे. आफ़्रिका आफ़्रिका का झाली, आणि भारत हा महासत्ता होणार या विषयी आपण बोलत असतो तो कसा होणार, ज्ञानविज्ञान, तंत्रज्ञान शिवाय होणार नाही. आपण २१ वे शतक ज्ञानाचे शतक माणतो तर या शतकामधे आपल्याला पुढे जायचे असेल तर त्यासाठी ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञानाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विज्ञान फ़ार महत्वाचे आहे. २) आपल्या देशातून जास्तीत जास्त नोबेल पारितोषिके कशी मिळतील तसेच नवसुर्जनशीलता कशी निर्माण होईल? उत्तर: "योगायोगाची गोष्ट आहे खर तर, काल मी दिल्लीत होतो. सकाळी ६.१६ ते ७.१५ मी राष्ट्र्पतींबरोबर मिटींगमध्ये होतो. त्यांनीही मला हेच विचारले, तसेच इंवेन्शन जे आहे ते असामान्यांपासून ते सामान्यांसुद्धा कसे मिळेल? खरे तर ही आनंदाची गोष्ट आहे की आपले राजकीय नेतृत्व, व्यवस्था ही विज्ञानाला पाठिंबा देते." आता आपल्या मुख्य मुद्द्यावरती येवू.आपण भारताच्या प्रगतीत ज्ञानविज्ञान तंत्रज्ञान यावरती बोललो तेर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, कि जेव्हा तुम्ही शास्त्रज्ञ होत ते पैसा पैश्यांसाती नको .त्यातून लक्ष्मी आली तरी ती वेगली गोष्ट आहे. ज्ञानविज्ञान ते तेत्रज्ञानाचा विकास करताना त्यातून जे तुनच्या मनाला जे समाधान होईल ते फार महत्त्वाचे आहे. मुलांनो-मुलींनो मला तुम्हाला एक सांगावेसे वाटते की, "विज्ञान हे एक गंमत आहे, एक उत्सुकता आहे त्याची गोडी निर्माण करण्यासाठी उत्तम शिक्षक हे महत्त्वाचे आहे. मलाही माझ्या भावे सरांनी गोडी निर्माण केली आणि म्हणून विज्ञानाची माहिती सोप्पी करुन ती ........ न करता करुन देण्याची जी खुबी असलेली पाहिजे अशा शिक्षकेची आज प्रचंड आवश्यकता आहे. कारण ते नंतर चैज्ञानिक घडवतील व पुढचा समाज घडवतील." "नोबेल" पारितोषिक मिळवायचे म्हणजे काहीतरी फार मोठी प्रयोगशाळा पाहिजे, पैसा पाहिजे, मोठी इमारत पाहिजे असे काहीही नाही. ती "कल्पनांवर" अवलंबून असते. आणि तुमचे विचार यावरती तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळते. २०१३ चे नोबेल पारितिषिक हे याला सार्थ आहे. याप्रमाणे जर कल्पना भारतामध्ये विकसीत झाल्या तर त्याला नोबेल मिळेल. (या सर्व आमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आधीच व्याख्यानात दिली. अत्यंत सुंदर अशी ही उत्तरे होती. यानंतर त्यांनी उपस्थितीतील श्रोत्यांना प्रश्न उपस्थित करण्यास सांगितले.) 3)सुरज : सर, आपल्या देशातील पारंपारिक ज्ञानाचा वापर करुन विदेशी लोक पॅटेंट घेत आहेत तर हे बदलण्यासाठी आमच्या सारख्या तरूण वर्गाने काय करावे? उत्तर: "अगदी सुंदर प्रश्न विचारला.हा इतका सुंदर प्रश्न आहे, तुम्ही टाळ्या वाजवा त्याच्यासाठी.उत्तरांना नुसत्या टाळ्या द्यायच्या नसतात तर, प्रश्नांपण टाळ्या द्यायच्या असतात कारण जितका प्रश्न चांगला, योग्य तेवढे उत्तर चांगले असते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे.आता आपण मोबाईल पाहातो. ८०-९० लोकांकडे मोबाईल आहे पण हा मोबाईल आला कोठून? फिजिक्स, इलेक्ट्रोनिकमध्ये जेवढे मुलभूत संशोधन झाले त्याच्यामुळे तर हा मोबाईल आला. आपले आयुर्मान आज वाढलेले आहे. आपल्या जीवनचक्रामध्ये विकास होत चालला आहे. हे का होत चालले आहे? हे केवळ ज्ञान-विज्ञान तंत्रज्ञान यांच्यामुळेच , म्हणून भारताला नवीन ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान हे स्वत: निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. इतर देशांवरती अवलंबून न रहाणे हे महत्त्वाचे आहे." (मुलाखत घेणारे विद्द्यार्थी:- सुरज घाडगे,धनंजय चव्हाण,निखील बहारवाल,अवंतिका बांबळे,अनुज नहार,पुजा क्षिरसागर,आकांक्षा भारदे) (मार्गदर्शक शिक्षक:-प्रा.देशमुख सर ) सुरज घाडगे (डी.सी.ई. 2nd यिअर) PicsVideo - A talk with Dr. Raghunath Mashelkar
|