Englishहिंदी
मराठीInterviewCreativityGalleryDesigned ByCongratulations |
बिरुदेव हजारे-एक युवा शास्त्रज्ञ!!!
Interviewवाऱ्यामुळे वीज निर्मीती होऊ शकते हे आपल्याला माहितीच आहे,पण स्थिर हवेतुन वीज निर्मिती करण्याची कल्पना
बिरुदेव हजारे यांना सुचली. डॉ. भटकर व डॉ. माशेलकर यांच्या सारख्या थोर शास्त्रज्ञांना भेटल्याची संधी युथ स्पेक्ट्रमच्या ग्रुपला मिळाली. एका सामन्य माणसाला काहीतरी नवीन करण्याची असामान्य इच्छाशक्ती व ध्येयाचे दर्शन आम्हाला घडले. त्यांचा सर्वात मोठा शोध म्हणजे अॅथ्रोपोजिनीक विंड मिल यात त्यांनी वातावरणामध्ये हवेचे प्रवाह कसे निर्माण होतात या मागचे कारणे परिस्थितीत समजुन घेतली व तशाच पद्धतीने काही प्रमाणात विध्दुत उर्जा व गुरुत्व बलाचा उपयोग करुन वारा निर्माण केला व त्यावर पाती फिरवुन विजनिर्मिती केली. सामान्य आर्थिक परिस्थितीत असलेले बिरुदेव यांनी विजिगीषु वृत्तीमुळे १ १/२ कोटीचे अॅथ्रोपोजिनीक विंड मिल हे प्रोजेक्ट केले. त्यांच्या मतानुसार, त्यांचे हे प्रोजेक्ट उर्जा अक्षयतेच्या नियमाविरुद्द काम करत आहे. त्यांचे शिक्षण १२वी पर्यंत झालेले आहे.गौरवाची गोष्ट अशी की त्यांनी या प्रकल्पासाठी ऑस्ट्रेलिअन पेटंट ही मिळवले आहे. इनपुट पेक्षा ३ पटीने जास्त उर्जा मिळते. उर्जा अक्षयतेचा नियम:- उर्जा ही निर्माण केली जाउ शकत नाही तसेच अंत ही करता येत नाही.उर्जा फक्त एका रुपातुन दुसऱ्या रुपात बदलता येते. १) तुमच्या प्रकल्पाला एक नाविन्यपुर्ण संकल्पना म्हणुन पहिलं जात आहे या वर तुम्हाला कसे वाटते? उत्तर:- हो, संकल्पना तशी नवीनच आहे.वयाच्या सतराव्या वर्षापासुन मी निरनिराळे छोटे प्रोजेक्ट केले आहेत. पुढील वर्षाच्या अभ्यासातुन मला असे वाटले की माझा हा प्रोजेक्ट उर्जा अक्षयतेच्या नियमाविरुद्द काम करतो. दिलेल्या एनपुट पेक्षा ३ पटीने जास्त उर्जा मिळते. २)तुमच्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला काही माहिती देऊ शकाल? उत्तर:- वाऱ्यामुळे वीज निर्मीती होऊ शकते पण पवनचक्की आपण काही ठरावीक ठिकाणीच इनस्टॉल करु शकतो.त्यासाठी खुप जागा लागते खुप खर्च येतो पण त्यातुन मिळणारे आऊटपुटचे प्रमाण ही जास्त नाही, पण माझा हा प्रकल्प या सर्व अडचणींवर मात करुन एक चांगला पर्याय उपलब्ध करुन देतो.हा प्रकल्प स्थिरवायुला वाऱ्यामद्दे रुपांतरीत करुन पवनचक्कीच्या कामी येतो. माझा प्रकल्प वायुच्या वेगाला वाढवतो व त्यामुळे मिळालेले आऊटपुट ही जास्त असते. सुरवातीला जरी स्थिर वायुचे वाऱ्यामध्ये रुपांतर करताना लागत असली, तरीही मिळणारे आऊटपुट दिलेल्या इनपुटपेक्षा ३ पटीने जास्त असते. त्याशिवाय त्याला कुठल्याही प्रकल्पाची गरज नाही, कमी जागा व्यापतो व प्रकल्प प्रदुषण मुक्त ही आहे. उर्जेची कमतरता असलेल्या आपल्या देशाच्या दृष्टीने हा प्रकल्प खुप महत्त्वाचा आहे. ३)हा प्रकल्प करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागला? उत्तर:-मी हा प्रोजेक्ट वयाच्या सतराव्या वर्षी सुरु केला. निरनिराळ्या प्रोजेक्ट मधुन मला ही संकल्पना सुचली,मग एका ध्येयाने मी त्यात सुधारणा करीत गेलो. ४)या प्रकल्पासाठी तुम्हाला कशीप्रेरणा मिळत गेली?मार्गदर्शन कोणी केले?त्यासाठी माहिती कोठून गोळा केली? उत्तर:-बालपणापारुन माझे निसर्गाकडे एक विशेष आकर्षण राहिले आहे विज्ञानाची जिज्ञासा असल्यामुळे निसर्गाच्या विविध चक्रांचा मी अभ्यास केला आहे, माझे गुरु विनायक कांबळे व मणीभाई देसाई यांच्या सहवासात राहिल्यामुळे मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. ५)ऑस्ट्रेलियन पेटंट मिळवताना तुम्हाला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला? उत्तर:- हा प्रोजेक्ट नवीन व निराळा असल्यामुळे पेटंट मिळवण्यात तशी खुप अडचणी आल्या नाही.पेटंट मिळवताना मला सांगण्यात आले होते की जगात कुठेही जर हा प्रकल्प केला गेला नसेल तरच पेटंट मिळेल. फक्त जपानमध्ये हा प्रकल्प झाले आहे,पण तपासणी नंतर ते माझ्या प्रकल्पापेक्षा खुप वेगळे आहे हे सिद्द झाले व मला पेटंट मिळाले. ६)पेटंट मिळवताना भाषेची अडचण आली का? उत्तर:- विज्ञानाच्या आवडीमुळे भाषेची अडचण जास्त भासली नाही.माझे सुत्र मी व्यवस्थीत पणे समजावुन घेतले, त्यामुळे मला भाषेचा जास्त अडथळा जाणवला नाही. मला असे वाटते की, विचारांना कुठली ही भाषा नसते. ७)प्रकल्प करताना आर्थिक अडचणी आल्या होत्या का?कौटुंबीक अडचणी कुठल्या आल्या? उत्तर:-माझे वडील शेतकरी होते. तरी ही मला व माझ्या भावांना वडीलांनी नेहमी प्रकल्प पुर्ण करण्यासाठी साथ दिली. माझे भावंड नेहमीच माझ्या मदतीसाठी होते. तसेच माझ्या गावकऱ्यांनी मला जमेल ती मदत केली. लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती खुपच बिकट होती.त्यामुळे शिक्षण सोडुन काहितरी व्यवसाय करायचा आणि त्यातुन मिळालेल्या पैशातुन घरात आई-वडीलांनाही थोडी फार मदत करातची व डोक्यातील नव नवीन विचारांना प्रत्यक्षात उतरवण्याच्या उद्देशाने मी शिक्षण सोडले.व माझे एक फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरु केले. माला बायको ही मला साथ देणारी व प्रेरणा देणारी मिळाली. ८) या प्रकल्पासाठी सरकार कडुन काही मदत मिळाली का? ऊत्तर:-सरकार कडुन माझ्या प्रकल्पासाठी कुठल्या ही प्रकारची मदत मिळाली नाही. तशी अपेक्षाही मी कधी केली नाही.मला असे वाटते की आपण शासनावर अवलंबुन राहणे सोडावे, कारण शासनासमोर अधीच खुप अडचणी आहेत. आपल्या समस्यांचे निवारण करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असायला हवे. ९)या प्रकल्पाचा आपल्या देशात कितपत विस्तार होऊ शकतो? उत्तर:-एक अॅथ्रोपोजिनीक विंड मिल १ एम.व्ही. एवढी वीज निर्माण करु शकते. भारत व महाराष्ट्र वीजेसाठी असलेली गरज बऱ्यापैकी आपण पुर्ण करू शकतो.हा प्रकल्प कुठेही कार्यान्वित करु शकतो. १०) आजच्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? उत्तर:-भारताला महासत्ता मिळवण्यासाठी आजच्या युवा पिढीने पुढाकार घेतला पाहिजे.देशासाठी काहीतरी करण्याची भावना मनात ठेवून पुढे चालत रहा.विज्ञानाचा अभ्यास करताना मांडलेले नियम सहज मान्य न करता ते सिद्द होतात का? हे तपासुन पहा. मी हाच संदेश त्यांना देईल की कठोर मेहनत करा,सत्य पडताळुन पहा मग यश नक्की येईल!!! (मुलाखत घेणारे विद्द्यार्थी:- सुरज घाडगे,स्नेहा कुर्ले,धनंजय चव्हाण,निखील बहारवाल,अक्षय वनारसे, आश्विनी चिव्हे,अवंतिका बांबळे,स्नेहल व्हावळ,आरती कांबळे,शुभम बोरसे) (मार्गदर्शक शिक्षक:-प्रा.देशमुख सर व पवार मॅडम) स्नेहा कुर्ले(डी ई ई व्दितीय वर्ष) Pics |